प्रत्येक व्यक्तीचा एक शैक्षणिक प्रवास असतो. त्या प्रवासामध्ये कधी यश असते तर कधी अपयश असते. लहानपणापासून मोठे होईपर्यंत अगदी वृद्ध होईपर्यंत प्रत्येक जण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो प्रत्येक क्षणाला. लहानपणी शिकण्याचा वेग अतिशय जास्त असतो. बालमानसशास्त्रामध्ये याचा विशेष असा उल्लेख आहे. माझे बालपण माझ्या गावांमध्ये इयत्ता चौथीचे पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई लिंबा केंद्र राजुरी नवगण तालुका जिल्हा बीड येथे झाले. यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या शिक्षण महात्मा फुले विद्यालय पारगाव मोठे तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे झाले. त्यावेळी गावातील नदी डोंगरी यावर पूल नव्हता. गावातील शाळा इयत्ता चौथी पर्यंतच होती. यानंतर पुढे राजुरी किंवा बीडला शिकायला जावे लागत असे. पारगाव ला माझी आजी असल्यामुळे तिथे माझ्या शिक्षणाची सोय झाली व पारगाव हे बाजारपेठेचे मोठे गाव होते. पारगाव ला शाळा ही कॉलेजपर्यंत आहे. पारगाव ला दोन माध्यमिक शाळा व केंद्रीय प्राथमिक शाळा इयत्ता सातवी पर्यंत होती. पारगावला बँक,दवाखाने, बाजार भरत असे. यानंतर मी परत इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण घेण्यासाठी गावापासून पाच किलोमीटर असणाऱ्या गजानन विद्यालय अर्थातच जुनियर कॉलेज मध्ये माझे इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण झाले. पुढे डीएड ला नंबर लागल्याने मी क्रांती स्मृती डीएड कॉलेज राजवाडा सातारा या ठिकाणी गेलो. या ठिकाणी माझे डीएड पूर्ण झाले. डीएड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन. डीएड झाल्यानंतर 14 फेब्रुवारी 2007 या दिवशी मी प्राथमिक शिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ केंद्रामध्ये जॉईन झालो. 2007 ते 2014 पर्यंत मी पोलादपूर तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून सेवा केली. यानंतर 19 जून 2014 साली आंतर जिल्हा बदलीने बीड तालुक्यातील येळंबघाट केंद्रामध्ये शिक्षक म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. माझ्या गावापासून हे गाव अंदाजे 45 किलोमीटर अंतरावर आहे. काही काळ मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजुरी नवगण येथेही शिक्षक म्हणून सेवा केली आहे. गेली अकरा वर्षे या केंद्रामध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करत आहे. माझ्या सध्याच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोईफोडवाडी. यावर्षी जिल्हा अंतर्गत बदल्या होणार आहे.त्याच्यामुळे इथून माझी बदली होण्यास मी पात्र आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करताना आजपर्यंत मी प्रामाणिकपणे शिक्षण देण्याचे विद्यार्थ्यांना काम केले आहे. माझी आजपर्यंत एकूण 18 वर्षे शैक्षणिक सेवा झाली आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून माझी अजून सोळा वर्षे सेवा बाकी आहे.
या शिक्षण प्रवासातून मी 2041 यावर्षी रिटायर होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारतामध्ये दरवर्षी बदल होत आहेत. आजपर्यंत मी अनेक प्रशिक्षण घेतली आहेत. या प्रशिक्षणातून वेळोवेळी मी माझे मत मांडले आहे. सातत्यपूर्ण व शैक्षणिक मूल्यमापनामध्ये ही नवीन नवीन बदल दररोज होत आहेत. तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. दररोज नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. AI अर्थातच Artificial Intelligence चा सध्याचा काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नोकऱ्या कालबाह्य होण्याचे कारण म्हणजे तंत्रज्ञान वाढत आहे. शिक्षण प्रवासातील हा माझा अनुभव थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या जीवन प्रवासामध्ये शिक्षण प्रवास अधिक आहे. परत एकदा निवांत कधीतरी शिक्षणाचा प्रवास सांगेल म्हणून क्रमशः
My Permanent Address is
SACHIN PISAL
Limbarui my village
New Shambhuraje Colony Pangri road Beed
Beed my district
Maharashtra my state
India my country.
My mobile number is 9421989236
खूप धन्यवाद आपण माझा संपूर्ण लेख वाचल्याबद्दल.