कांबळेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे इयत्ता चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न –
शैक्षणिक वर्ष 2024 -25 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे इयत्ता चौथीचा वर्गाचा निरोप समारंभ शाळेत संपन्न झाला . सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री . ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक . रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ .सुनीता शिंदे यांनी परिश्रम घेतले .इयत्ता चौथी मध्ये चालू शैक्षणिक वर्षांमध्ये इ ४ थी च्या वर्गात 30 विद्यार्थी होते .इयत्ता पहिलीपासून सदरच्या वर्गामध्ये इंग्रजी खाजगी माध्यमातून विद्यार्थी दाखल झाले होते . सदरच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करण्याचे काम वर्गशिक्षिका सौ .मनिषा चव्हाण यांनी केले .
प्रज्ञाशोध तयारी , मंथन स्पर्धा परीक्षा, भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा , एम टी एस ऑलिंपियाड परीक्षा , श्रेयशी आदी सर्व स्पर्धा परीक्षा माध्यमातून इ . १ली पासूनच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी वर्गशिक्षीका यांनी परिश्रम घेतले .इ ४ थी प्रज्ञाशोध परीक्षा अंतर्गत शाळा नियोजनातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग उपक्रमांतर्गत शाळेतील सर्वच शिक्षकांनी जादा तासिका च्या माध्यमातून या वर्गास मार्गदर्शन करून योगदान दिले .
शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना शाळेत अभ्यासाबरोबर विविध उपक्रमात सहभागी होता आल्याचे मनोगतामध्ये सांगीतले . खेळ ,कला , क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, बाल संस्कार शिबीर , मल्लखांब ,ॲबॅकस आदी उपक्रमांचे शाळेतील शिक्षकांच्या नियोजनातून संधी मिळाल्याने नवनविन गोष्टी शिकता आल्याचे सांगितले . सर्व शिक्षकांनी विद्यार्थी वर्गाला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या .
विद्यार्थांना वर्गशिक्षिका यांनी निरोप समारंभा निमीत्ताने १ ते ४ मधील सर्वांना चिकण बिर्याणीचे नियोजन केलेने सर्व विद्यार्थ्यांनी चिकण बिर्याणी वर मनसोक्त ताव मारला .
जून २०१८ पासून सातत्याने शाळेतील सर्व शिक्षकांच्या योगदानातून पालक सहभागातून विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी स्पर्धा परीक्षा बरोबरच विविध सहशालेय उपक्रमांची योग्य अंमलबजावणी शाळेचा पट वाढ होत आहे खाजगी इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी जि प शाळेकडे येत आहेत . शाळा परीक्षा सुरु असून १५ एप्रिल पासून शाळेत बालसंस्कार वर्ग सुरु असल्याने विद्यार्थी वर्गाला अपेक्षित वर्तन बदलास , योग्य संस्कारा साठी वाव मिळत आहे . ग्रामिण भागात खाजगी इंग्रजी माध्यमातून सातत्याने दरवर्षी विद्यार्थी खेचून आणून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणेवर शाळेतील सर्व शिक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादातून पालक वर्गात विश्वासार्हता निर्माण करून पालक सहकार्यातून उपक्रम राबविण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसून येतो .

Leave a Comment